27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशांतीगिरी महाराजांची निवडणूक वादात संत जनार्दन स्वामींचा फोटो वापरण्यास भक्तांचा आक्षेप

शांतीगिरी महाराजांची निवडणूक वादात संत जनार्दन स्वामींचा फोटो वापरण्यास भक्तांचा आक्षेप

दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणारे महंत शांतिगिरी महाराज यांची निवडणूक वादात आली आहे. कारण लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता जारी झाल्यांनतर दुसऱ्याच दिवशी संत जनार्दन स्वामींचा फोटो शांतिगिरी महाराज यांनी वापरू नये असा आक्षेप काही भक्तानी घेतला आहे. शांतिगिरी महाराज यांनी प्रचारासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचा फोटो काही पत्रकमध्ये वापरला आहे . ती पत्रके खाली पडल्यांनंतर संत जनार्दन स्वामींचा अवमान होतो असे वृत्त काही वाहिन्यांनी दाखवले असल्याचा दावा भक्तांनी केला आहे. यामुळे त्यांची प्रतिमा मालिन होते आणि त्यांचा नावाचा वापर राज कारणासाठी केला जातो .

दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणारे महंत शांतिगिरी महाराज यांची निवडणूक वादात आली आहे.< nashik Shantigiri Maharaj election controversy news > कारण लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता जारी झाल्यांनतर दुसऱ्याच दिवशी संत जनार्दन स्वामींचा फोटो शांतिगिरी महाराज यांनी वापरू नये असा आक्षेप काही भक्तानी घेतला आहे. शांतिगिरी महाराज यांनी प्रचारासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचा फोटो काही पत्रकमध्ये वापरला आहे . ती पत्रके खाली पडल्यांनंतर संत जनार्दन स्वामींचा अवमान होतो असे वृत्त काही वाहिन्यांनी दाखवले असल्याचा दावा भक्तांनी केला आहे. यामुळे त्यांची प्रतिमा मालिन होते आणि त्यांचा नावाचा वापर राज कारणासाठी केला जातो . Devotees object to using< Sant Janardan Swami's>photo in< Shantigiri Maharaj's> election controversy

हे प्रकार थांबे यासाठो संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि व भक्त मंडळ यांनी आक्षेप घेतला आहे . लोकशाही मध्ये सर्वाना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. परंतु २००९ ची लोकसभा निवडणूक संभाजीनगर मध्ये लढवताना त्यांनी कोठेही संत जनार्दन स्वामी यांच्या नावाचा आणि फोटो चा वापर केला नाही त्यामुळे त्यांच्या प्रचारावर आम्ही कोणीही आक्षेप घेतला नव्हता किंवा विरोधही केला नव्हता . त्यामध्ये त्य्याचा दारुण पराभव झाला मात्र आता ते नाशिकमध्ये संत जनार्दन स्वामी यांच्या नावाचा फोटो वापरुंन प्रचार करत आहेत .त्यामुळे त्यांनी असा वापर करणे थांबवले नाही तर आम्हाला पुढचे पाऊल उचलावे लागेल.

उत्तराधिकारी मध्ये सन २००३ चा कोपरगाव कोर्ट चा निकाल आहे. त्यांच्या उमेदवारीला आमचा कोणताही विरोध नाही आमचे एकच म्हणणे आहे कि त्यांनी आमच्या भावना दुखवू नये. २ लाख भक्त परिवार त्यांच्या मागे आहे तर त्यांना कोणाचाही फोटो वापरण्याची गरज नाही जर ते निवडणुकीत निवडून आले तर त्यांचा आम्ही विश्वस्तांच्या वतीने सर्वप्रथम सत्कार करू असे अनंत सुरेश पाचोरकर हुडेश्वर त्रम्बकेश्वर ट्रस्ट त्रंबकेश्वर यांनी सांगितले.

शांतिगिरी महाराज स्वतः ला संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचे सांगतात मात्र ते कोणत्याही प्रकारचे उत्तराधिकारी नाहीत. ते केवळ संत जनार्दन संतपरंपरेतील एक संन्याशी आहेत त्यामुळे त्य्यानी उत्तराधिकारी असल्याचे भासवु नये किंवा तसा वापर करू नये असा इशारा भक्तगण यांनी दिला आहे.

शांतिगिरी महाराज स्वतः ला संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचे सांगतात मात्र ते कोणत्याही प्रकारचे उत्तराधिकारी नाहीत. ते केवळ संत जनार्दन संतपरंपरेतील एक संन्याशी आहेत त्यामुळे त्य्यानी उत्तराधिकारी असल्याचे भासवु नये किंवा तसा वापर करू नये असा इशारा भक्तगण यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी