30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रभाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..!

भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..!

भाकरी ही फिरवावीच लागते. नाही फिरवली तर ती करपते. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही, असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील पदाधिकारी बद्दलविण्याचे संकेत बुधवारी दिले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे भाकरी फिरविण्याचे काम दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाकरी ही फिरवावीच लागते. नाही फिरवली तर ती करपते. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही, असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील पदाधिकारी बद्दलविण्याचे संकेत बुधवारी दिले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे भाकरी फिरविण्याचे काम दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला. पदाधिकाऱ्यांना राजकारणातील आपले अनुभव कथन करताना पवार म्हणाले, १९६० साली मी युवक काँग्रेसचा पदाधिकारी झालो, १९६४ साली युवक काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख झालो आणि नंतर १९६६ साली राज्यातील युवकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक गोष्टींची आपल्याला माहिती व संधी नसते. पण निर्धार पक्का असला तर आपण अडचणींवर निश्चित मात करू शकतो. त्यामुळे नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. जे लोक संघटनेत मागील सात-आठ वर्षे एकाच पदावर काम करत आहेत, त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात आपण पक्षाचे प्रांताध्यक्ष, मुंबईचे कार्याध्यक्ष आणि इतर नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांना संघटनेत घेऊन त्यांना कामाची संधी दिली पाहिजे. या कामातून जो आपले स्थान प्रस्थापित करेल त्याला महानगरपालिकेत संधी देण्याची गरज आहे. मुंबई शहरात कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे पण इथले सामान्य कुटुंब टिकले पाहिजे. नव्या पिढीला प्रोत्साहित करून त्यांच्यातून नवीन नेतृत्व तयार केले जाईल. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवनामध्ये ते यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी