टीम लय भारी
मुंबई : राज्यात राष्ट्र महामार्गाची कामे करत असताना लोकप्रतिनिधींकडून अडथळा निर्माण केला जात आहे. या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रील उध्दव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. यामुळेच राज्यातील महसूल अधिकाऱ्यांवर केंद्र सरकार नाराज आहे (Central government angry over revenue officials in the state).
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून तक्रार केली होती. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या एका मुद्द्यांने डोक वर काढले आहे.
ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारला फटकारले
मराठा आरक्षणाबाबत रोहित पवारांनी केंद्र-राज्य सरकारला केले आवाहन!
याच संदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाचे संचालक राजेश गुप्ता यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे (The letter has sparked political debate).
‘नरेंद्र मोदींकडे भीक मागत नाही’
राष्ट्रीय महामार्गांच्या कामामध्ये ३ हजार कोटींचा स्पीड ब्रेकर लागला आहे. या बदल्यात भरमसाठ मोबला दिला जात असल्याने पुढे काम करणे शक्य होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच जमीन अधिग्रहणामध्ये अपील करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना महसूल अधिकारी कृषी जमिनीच्या किंमतीच्या ७ ते २७ पट अधिक मोबदला देत असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. याच मुद्द्यांवरून राज्यातील महसूल अधिकाऱ्यांवर केंद्र सरकार नाराज झाले आहे.