26 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
HomeराजकीयSwabhimani : स्वाभिमानीचे ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन

Swabhimani : स्वाभिमानीचे ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन

टीम लय भारी

कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे, या मागणीसाठी स्वाभिमानी  (Swabhimani) शेतकरी संघटनेच्या वतीने ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन करण्यात येणार आहे.

गुरुवार ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत रात्रभर ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, “केंद्र सरकारने देशातील शेतक-यांवर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतक-यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत ७ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडीत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूची भूमिका घेत आहेत.

त्या शेतक-यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन करण्यात येणार आहे. रात्री पिठलं-भाकरं खाऊन या आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. रात्रभर भजन आणि किर्तन केलं जाणार आहे. केंद्र सरकारला सुबुध्दी दे व शेतक-यांना न्याय मिळू दे या मागणीसाठी आत्मक्लेश जागर आंदोलन केले जाणार असून रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जागर होणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी