टीम लय भारी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची (Lockdown 5.0) घोषणा केली असून लॉकडाउन 5.0 संदर्भात संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता 30 जूनपर्यंत (Lockdown 5.0 in the country extended) फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. अन्य भागात टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.
कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. पण कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. 1 जूनपासून हे दिशानिर्देश लागू होतील ते 30जूनपर्यंत कायम असतील.
रात्रीची संचारबंदी शिथील, मात्र सुरूच रहाणार
रात्री 9 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी कमी करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था सुरू करण्याबाबत सरकार नंतर दिशानिर्देश जारी करणार आहे.
Lockdown to continue in Containment zones till June 30, only essential activities allowed: MHA #UNLOCK1 pic.twitter.com/ViPB0nfpJY
— ANI (@ANI) May 30, 2020
8 जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, धार्मिक प्रार्थना स्थळे सुरू होणार
अनेक राज्यांनी मॉल सुरू करण्याची मागणी केली होती. मॉलही टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. शाळा, कॉलेज दुस-या टप्प्यात उघडण्याची शक्यता आहे. तर 8 जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंटही सुरू करण्यात येतील. मंदिर, मशिद, गुरुद्वारा आणि चर्च सुरू करण्यात येतील. पण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल. धार्मिक स्थळांसह सलूनही सुरू होतील. पण त्यासाठी अटी लागू केली जातील. त्यांचे पालन करावे लागेल. मात्र राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
कुठेही जाता येणार
एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. राज्यातही एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाता येणार आहे. तसेच कुठेही येण्या-जाण्यासाठी आता कुठलीही परवानगी घ्यावी लागणार नाही.
राज्यांकडे अधिक अधिकार
राज्यांना केंद्र सरकारने जास्त अधिकार दिले आहेत. बस, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे. केंद्र सरकारने बंदी हटवल्यानंतर राज्य सरकार आता निर्णय घेऊ शकणार आहेत.
पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार
– शॉपिंग मॉल उघडणार
दुस-या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील.
तिस-या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन खालील विषयासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी
राज्य सरकार काय निर्णय घेणार?
केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली असून राज्य सरकार आणि स्थानिक जिल्हा प्रशासन तेथील परिस्थिती पाहून निर्णय घेईल, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्र सरकार कुठे सवलत देणार आणि कुठे निर्बंध कायम ठेवणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष आहे.
खालील लिंकवर पहा, केंद्र सरकारचा जीआर