31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यपाल जयंत पाटलांशी बोलले होते का? दिग्विजय सिंहांचा सवाल

राज्यपाल जयंत पाटलांशी बोलले होते का? दिग्विजय सिंहांचा सवाल

लय भारी न्यूज नेटवर्क

दिल्ली : अजित पवारांनी राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले. त्या पत्रासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पत्र जोडलेले होते का? राज्यपाल जयंत पाटलांशी बोलले होते का? असे सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केले आहे.

दिग्विजय सिंह यांनी माध्यमांशी बोलतांना भाजप सरकारवर जोरदार शरसंधान साधलं. भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. गोवा, मेघालय,आसाम,कर्नाटक या राज्यांची ताजी उदाहरणं आहेत. भाजप लोकशाहीवर घाला घालत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या वेळी प्रचाराच्या वेळी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराबाबत भाषणात बोलत होते. त्याच अजित पवारांना सोबत घेतलं आहे. अशीही टीका दिग्विजयसिंह यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी