लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांच्या सह्यांचे पत्राचा अजित पवारांनी राज्यपालांकडे सादर केले. परंतु हे पत्र भाजपसाठी नव्हते. तरीही या पत्राच्या आधारे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शपथ गेतली. आता मात्र जवळपास 48 आमदार शरद पवारांबरोबरच्या बैठकीला उपस्थित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी बहुमत असल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि अजित पवारांनीही झालेली चूक स्वीकारून परत यावे व उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे सगळे आमदार एकत्रित
काँग्रेसचे सगळे आमदार काही वेळापूर्वीच मुंबईत विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. या आमदारांना आता भोपाळ किंवा जयपूरला हलविण्यात येईल. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांनाही हलविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
शरद पवारांसोबत ४८ आमदार, अजितदादांकडे उरले पाच जण
फोटो फिचर : फडणवीस, पवार यांचा असा रंगला शपथविधी सोहळा
राष्ट्रवादीचे सहा आमदार लंपास, इतर आमदारांना वाचविण्याचे प्रयत्न