टीम लय भारी
कोल्हापूर : भीमा कोरेगावप्रकरणी जी काही चौकशी करायची आहे ती लवकर करा. देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे. आम्ही स्वच्छ आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
‘महाविकास आघाडी’ सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप करीत भाजपच्या वतीने मंगळवारी कोल्हापूरात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
चंद्रकांतदादा पुढे म्हणाले की, अजित पवार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पण तेच मुख्यमंत्र्यांसारखे वागत आहेत. सगळ्या घोषणा तेच करतात. या सरकारमधील तिन्ही पक्षांतील नेत्यांचे एकमेकांवर वजन आहे. त्यामुळे त्यांचे सरकार आपोआपच पडेल. कोरेगाव भीमा प्रकरणात राज्य सरकारने केंद्राला सहकार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
हे सुद्धा वाचा
पंकजाताई म्हणाल्या, माझ्या स्वाक्षरीमध्येही गोपीनाथ मुंडे यांचे नाव
राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे चंद्रकांतदादा पाटलांनी केले कौतुक