27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रया कारणामुळे महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक : राज ठाकरे

या कारणामुळे महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक : राज ठाकरे

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे महाराष्ट्रातच का दिसत आहे यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. आणि त्या राज्यांमध्ये कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत,’ असे मनसे अध्यक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

‘लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेक कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद केला,’ असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ‘मागच्या लॉकडाउनच्या वेळेला जेव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झाले नाही,’ असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘छोट्या उद्योगांनी त्यांचे उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असे सरकारचे म्हणणे आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी,’ अशी मागणी ही राज ठाकरेंनी केली आहे.

वीजबील कशी भरायची?

‘लॉकडाऊनच्या काळात वीजबिल माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफिस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिल कशी भरायची?’, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवे

‘अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवे. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत. कंत्राटी कामगारांना सरकारने महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवे,’ अशा सूचना यावेळी राज ठाकरे यांनी केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी