टीम लय भारी
मुंबई :- मुंबईत मे महिन्यात आलेल्या तौते वादळात बॉम्बे हाय येथे पी-३६५ तराफ्याला भीषण अपघात झाला असताना शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राजभवन येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला (Governor felicitates life-saving naval officers).
आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले (Officials made the statement at the time of the accident).
नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
विठ्ठला मुख्यमंत्र्यांनी जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेची पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना
लोटांगण घातले असते; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना खोचक टोला
Constitutional functionaries are bound by Constitution, says Bombay HC on Maha governor case
राज्यपालांनी अधिकाऱ्यांच्या शौर्याचे कौतुक करीत नौदलाच्या सर्व जवानांना शाबासकी केली. आयएनएस तलवारचे कमान अधिकारी कॅप्टन पार्थ भट्ट जहाजावर कर्तव्य बजावत असल्या कारणाने राज्यपालांना भेटण्यास येऊ शकले नाही.