टीम लय भारी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच विधान परिषद निवडणूक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत माविआला जनतेने मोठा प्रतिसाद दिला. असे विधान राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे (‘Mahavikas Aghadi’ government has earned the trust of the people).
मागील काही वर्षांपासून धर्माच्या नावावर राजकारण सुरु आहे. लोकशाही, देशाचे संविधान यांना संपण्याचे कारस्थान राजले जात आहे. परंतु, हा देश लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे. तसेच जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा
Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात
अहमदनगर जिल्ह्यातील टिळक भवन येथे विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय बनसोडे, जयप्रकाश छाजेड, शरद आहेर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
Mumbai News Live Updates: Maharashtra records lowest covid-19 cases in 17 months