26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक निर्भय महाराष्ट्र्र पार्टीचे मनपावर आंदोलन

नाशिक निर्भय महाराष्ट्र्र पार्टीचे मनपावर आंदोलन

पंचवटी भागातील अष्टविनायक नगर आणी समरथ नगर भागात सातत्याने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने निर्भय महाराष्ट पार्टीने मनपावर आंदोलन केले. संस्थापक अद्यक्ष जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मनपाच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . या भागातील रहिवाशाना गेल्या अनेक वर्षापासून दोन वेळचे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. तसेच येथील रस्त्याची देखील मोठ्या प्रमानात दुरावस्था असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न जोपर्यँत मार्गी लागत नाही

पंचवटी भागातील अष्टविनायक नगर आणी समरथ नगर भागात सातत्याने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने निर्भय महाराष्ट पार्टीने मनपावर आंदोलन केले. संस्थापक अद्यक्ष जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मनपाच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
या भागातील रहिवाशाना गेल्या अनेक वर्षापासून दोन वेळचे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. तसेच येथील रस्त्याची देखील मोठ्या प्रमानात दुरावस्था असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न जोपर्यँत मार्गी लागत नाही तोपर्यँत कोणत्याही प्रकारची घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारली जाऊ नये, येत्या आठ दिवसात मनपाने हा प्रश्न सोडवला नाही तर मनपात ठिय्या आंदोलन केलं जाईल आणि त्यासाठी सर्वस्वी महापालिका जबाबदार राहील असा इशारा निर्भय महाराष्ट्र्र पार्टीने निवेदनाद्वारे मनपा आयुक्ताना दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी