28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeएज्युकेशनमाणदेशी कादंबरीने मराठी भाषेला दिले २०० नवीन शब्द

माणदेशी कादंबरीने मराठी भाषेला दिले २०० नवीन शब्द

ग. दी. माडगूळकर यांची माणदेशी माणसं आणि बनगरवाडी या दोन कादंबरी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत(Mandeshi Kadambari gave 200 new words to Marathi language). माणदेशी माणसांचं जीवन हे महाराष्ट्रीय लोकांच्या दृष्टीने नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. असं अस्सल माणदेशी साहित्य नव्याने वाचायला मिळणं आता दुरापास्त झालंय. अशा या वातावरणात नागू विरकर या साहित्यिकांनी हेडाम नावाची कादंबरी नव्याने लिहिली आहे. एका वर्षातच या कादंबरीच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. चौथी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. मेंढपाळ, शेतकरी, कष्टकरी अशा लोकांचं चित्रण या कादंबरीतून मांडण्यात आलंय.

ग. दी. माडगूळकर यांची माणदेशी माणसं आणि बनगरवाडी या दोन कादंबरी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत(Mandeshi Kadambari gave 200 new words to Marathi language). माणदेशी माणसांचं जीवन हे महाराष्ट्रीय लोकांच्या दृष्टीने नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. असं अस्सल माणदेशी साहित्य नव्याने वाचायला मिळणं आता दुरापास्त झालंय. अशा या वातावरणात नागू विरकर या साहित्यिकांनी हेडाम नावाची कादंबरी नव्याने लिहिली आहे. एका वर्षातच या कादंबरीच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. चौथी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. मेंढपाळ, शेतकरी, कष्टकरी अशा लोकांचं चित्रण या कादंबरीतून मांडण्यात आलंय.

Independence Day | माण खटावमध्ये आहे देशातील पहिली ग्रामपंचायत (भाग १)

कादंबरीत खास माणदेशी शब्दांचा विपूल वापर करण्यात आला आहे. तब्बल २०० शब्द या कादंबरीने मराठी भाषेला दिले आहेत. नागू विरकर यांना मुंबई कार्यालयातील आज लय भारीच्या स्टुडीओमध्ये आज खास निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विरकर यांनी या कादंबरीविषयी माहिती दिली. माणदेशी माणूस हा अत्यंच चिवट व परिस्थितीशी झुंजणारा असतो. अपयश व पराजयाचा जवळ जावून पोचला तरी तो झुंज सोडत नाही. परिस्थितीवर मात करण्याची त्याची जिद्द सदैव असते, अशा पद्धतीची मांडणी या कादंबरीत करण्यात आली आहे.

Jaykumar Gore | देवेंद्र फडणवीस आणि भाजपमुळे माण – खटाव २० वर्षे मागे गेला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी