टीम लय भारी
मुंबई : सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्राने अचानक सीबीआयकडे दिला. सीबीआयने नक्की काय तपास केला आहे, याबद्दल आम्हालाही उत्कटता आहे, अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे ( Anil Deshmukh said, we are waiting for Sushant Singh Rajput’s investigation ).
मुंबई पोलिसांकडून अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तपास केला जात होता. परंतु हा तपास अचानकपणे सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला. सीबीआयला तपासात काय मिळाले याची आम्ही सुद्धा उत्कटतेने वाट पाहात आहोत ( Anil Deshmukh waiting for findings of Sushant Singh Rajput’s case ) .
हे सुद्धा वाचा
सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजरवर बलात्कार, सुशांतची हत्या : नारायण राणे
सुशांतने आत्महत्या केली आहे, की त्याची हत्या केली आहे याबाबत लोकांकडून विचारणा होत आहे. त्यामुळे आम्हीही सीबीआयच्या तपासाची वाट पाहात आहोत, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही म्हणून विरोधकांनी गोंधळ घातला होता. बिहार पोलिसांनी तर त्यांच्या कार्यकक्षेत नसतानाही या गुन्ह्याच्या तपासाला सुरूवात केली होती.
#SushantSinghRajput case was being probed by Mumbai Police professionally but it was suddenly handed over to CBI. We too are eagerly waiting to see their finding. People ask did he die by suicide or was he murdered. We're awaiting the probe's result: Maharashtra HM Anil Deshmukh pic.twitter.com/pQXhYJkjRY
— ANI (@ANI) September 28, 2020
सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने तपासाला सुरूवात केली. परंतु १५ दिवस उलटून गेले तरी सीबीआयने या प्रकरणात एफआयआरची नोंद केलेली नाही. त्यामुळे सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचे राजकारण करण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेमधूनही भाजप व केंद्र सरकारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी कान टोचल्यानंतर सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. प्रोफेशनल पद्धतीने सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.