लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी तेथील गाव पातळीवर काय वातावरण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे(BJP vs Congress). सदर व्हिडिओ मध्ये तुषार खरात यांनी शनिशिंगणापूर येथील डॉ. बाबासाहेब शिरसाठ आणि गावठे या मतदारांशी तेथील राजकीय मुद्दयांवर संवाद साधला आहे.
डॉ. शिरसाठ यांनी भाजपविषयी बोलताना त्यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली असून, गांधी घराण्याचं बलिदान सर्व भारतीयांनी स्मरणात ठेवायला हवं हे ही सांगितलं. काही दशकांपूर्वी लालकृष्ण अडवानी आणि अटलबिहारी वाजपेयी या जोडीने देशाच्या विकासासाठी किती उत्कृष्ट काम केले असून मोदीगटाने त्याचा फायदा उचलत अडवानी आणि अटलजींना भाजपमधून सहज साईडलाईन केले आहे. त्यामुळे आता मतदारांना या फोडाफोडीच्या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आला असून यावेळेस विकासाच्या मुद्द्यावरच मतदान केले जाईल असे मत या वेळी डॉ. शिरसाठ आणि गावठे यांनी लय भारीशी संवाद साधताना मांडले.
कॉंग्रेसच्या विकासनितीमुळेच आमची प्रगती, तरीही आमच्या मुलाच्या डोक्यात मोदीप्रेम !
लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी तेथील गाव पातळीवर काय वातावरण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ मध्ये तुषार खरात यांनी शनिशिंगणापूर येथील डॉ. बाबासाहेब शिरसाठ आणि गावठे या मतदारांशी तेथील राजकीय मुद्दयांवर संवाद साधला आहे.