टीम लय भारी
टोकियो : टोकियो पॅरालीम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारला थाळीफेकमध्ये कांस्य पदक मिळाले होते. परंतु विनोदला हे पदक परत करावं लागणार आहे . कारण त्याला असलेला आजार हा वर्गीकरण निरीक्षणामध्ये अयोग्य ठरवण्यात आला आहे (Vinod Kumar will have to return the bronze medal).
विनोदला पुरुषांच्या F५२ थाळीफेक स्पर्धेत अयोग्य ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्याने जिंकलेलं कांस्य पदक अयोग्य मानण्यात आले. विनोदने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत १९. ९१ मीटर लांब थाळी फेकत कांस्य पदक पटकावले होते. परंतु इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला या खेळात समाविष्ट करण्यात प्रश्न उचले होते. त्यानंतर सोमवारी पदक वितरणाच्यावेळी विनोदला बाद म्हणून घोषित करण्यात आले.
Tokyo Paralympics : राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अवनी लेखराला बक्षीस
Tokyo Paralympics : अवनी लेखराने भारतात इतिहास रचला, नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले
F५२ थाळीफेक स्पर्धेत सहभागी असलेले खेळाडू यांच्या मांसपेशी कमजोर असतात. तसेच त्यांना अधिक हालचाली करता येत नाही. काहींच्या मणक्यात त्रास असतो तर एखादा शरीराचा एक भाग तुटलेला असतो. अशा आजारांनी त्रस्त असलेले खेळाडूच या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. याच पार्श्ववभूमीवर विनोदच्या आजारावर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी प्रश्न उचले. त्यामुळे चौकशीनंतर विनोदला अपात्र ठरवत त्याला कांस्य पदकापासून मुकावे लागले (Vinod Kumar was disqualified from the bronze medal after interrogation.).
शिवसेना खासदाराच्या संपत्तीवर ईडीचा डल्ला
भारताने आतापर्यंत पॅरालीम्पिकमध्ये ६ पदके पटकावली आहेत. यामध्ये एक सुवर्णपदक, चार रोप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे. भारत बाकी देशांच्या तुलनेत पदक टॅलीमध्ये २६ व्या स्थानावर आहे.