टीम लय भारी
मुंबई : ‘लॉकडाऊन’ची ( Lockdown21 ) ऐसीतैसी करणाऱ्या वाधवा बिल्डरला प्रवासाचे परवानगी पत्र दिल्या प्रकरणी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (IPS) यांच्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे. गुप्ता यांनी वाधवा बिल्डरला खंडाळ्यावरून महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी कशी दिली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
As per discussion with Hon. CM, Mr Amitabh Gupta, Principal Secretary (special), has been sent on compulsory leave with immediate effect, till the pending of enquiry, which will be initiated against him.#LawSameForEveryone
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 9, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही तडकाफडकी कारवाई केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्या’चे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. ‘गुप्ता यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे’ही देशमुख यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
आम्हाला ट्विटरवर फॉलो करा
#Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी https://t.co/ZJVYivYC5m@AnilDeshmukhNCP @OfficeofUT @Kharat10Tushar
— Lay Bhari (@LayBhari3) April 9, 2020
‘लॉकडाऊन’ ( Lockdown21 ) असतानाही गुरूवारी वाधवा बिल्डरच्या कुटुंबातील तब्बल २३ जण खंडाळ्यावरून महाबळेश्वरला गेले होते. ‘हे २३ जण आपले कौटुंबिक स्नेही आहेत. मी त्यांना ओळखतो’ असे पत्र गुप्ता यांनी दिले होते. पाच गाड्यांमधून या २३ जणांना प्रवास करण्याचीही परवानगी या पत्रात दिली होती.
देशात लॉकडाऊनची ( Lockdown21 ) कडक अंमलबजावणी सुरू आहे. असे असताना एका पर्यटनस्थळी जाण्यासाठी धनाढ्य बिल्डरला चक्क गृह विभागाच्या प्रधान सचिवांनीच परवानगी दिल्याने खळबळ उडाली होती. लॉकडाऊनच्या तीन तेरा वाजवत वाधवा कुटुंबियांची वरात ( Lockdown21 ) खंडाळ्यावरून महाबळेश्वरला गेली. त्यावेळी पाचगणी पोलिसांनी त्यांना अडवले. पाचगणी पोलिसांमुळे अमिताभ गुप्ता यांचे पितळ उघडे पडले.
विशेष म्हणजे, वाधवा बिल्डर वादग्रस्त आहे. सीबीआयकडून त्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. अशा वादग्रस्त व्यक्तीसोबत गुप्ता यांचे साटेलोटे कसे काय असाही सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकाराविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. विरोधकांनीही सरकारवर सडकून टीका केली.
अखेर गुप्ता यांच्या गलथानपणाची गंभीर दखल मुख्यमंत्री व अनिल देशमुख यांनी घेतली, व त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, सातारा पोलिसांनी वाधवा कुटुंबियांच्या २३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे सुद्धा वाचा