२६ जानेवारी २०२४ रोजी मराठा कुणबी आरक्षणाच्या बाबतीत काढण्यात आलेला सगेसोयरे शासन राजपत्र मसुदा रद्द करण्यात यावा अन्यथा ओबीसी भटके विमुक्तांचे मतदान विसरा अशा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षा कविताताई कर्डक यांनी दिला आहे.सगेसोयरे शासन राजपत्र मसुदा रद्द करण्याबाबत आज नाशिक शहर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. यावेळी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्या बोलतो होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी हा सगळ्याच नागरिकांचा प्रतिनिधी असतो, आमदार हा कुठला एका जातीचा किंवा धर्माचा नसतो असे असताना जेव्हा ५४ टक्के ओबीसी समाजावर अन्यायकारक निर्णय विधिमंडळात होत आहे, अशा वेळेस लोकप्रतिनिधी मूक गिळून गप्प का बसलेले आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जो ओबीसी समाजाच्या हितासाठी आवाज उठवणार फक्त त्यालाच ओबीसी समाज मतदान करेल जो झुंडशाहीच्या दबावाला बळी पडेल, त्याला विधिमंडळात जाण्याचा अधिकार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, भालचंद्र भुजबळ, महिला शहराध्यक्ष आशाताई भंदुरे, समता परिषदचे मध्य नाशिक विभाग अध्यक्ष नाना पवार, पंचवटी विभाग अध्यक्ष सचिन जगताप, नाशिक रोड विभाग अध्यक्ष अजय बागुल, सातपूर विभाग अध्यक्ष भरत जाधव, सिडको विभाग अध्यक्ष अमोल नाईक,राका शेठ माळी, शंकर मोकळ, अरुण थोरात, पोपटराव जेजुरकर ,श्रीराम मंडळ, अरुण थोरात, गजू भाऊ घोडके , ज्ञानेश्वर महाजन, योगेश दिवे, अविनाश माळी, मीनाक्षी काकळीज, रूपाली पठारे, दिलीप माळी, अर्जुन भडके, अंजू थामीन, सुनील देवरे, कृष्णा काळे, सुनील ढगे, पप्पू शिंदे, संतोष भुजबळ, प्रणाली पेंढारकर, मनीषा अहिरराव, मंदा बागुल ,ललिता निकम, नमिता कुकडे, मीनाक्षी पगार, सुवर्णा नागरे ,मोतीराम सोनवणे, शिवाजी तिडके, दत्तू माळी, गोविंद तिडके, संतोष तिडके, विलास वाघ, मच्छिंद्र खैरे ,ज्ञानेश्वर तिडके, बन्सीलाल बाविस्कर, स्वप्निल कासार , पप्पू तिडके ,रमेश तांबे, वंदना अहिरे, अण्णासाहेब जावळे, धनंजय थोरात, रोशन शिंदे, मोतीराम कोट, गौतम तिडके, रवींद्र पेहरकर, संतोष पुंड, दीपक गांगुर्डे, प्रकाश महाजन ,शशिकांत सोनवणे, सतीश इंगळे, मोतीराम सोनवणे, संजय लोखंडे ,निशा जनके, मुकेश झंके, मंगला मोकळ, रोहिणी रोकडे, राहुल घोडे, गणेश घोडे, रामभाऊ गायकवाड, गोरख चहाळे, भगवान किरण, भावसार सागर, संजू व्यवहारे, राजू खतीब, बाळासाहेब तिडके, संतोष तिडके, पप्पू तिडके, दत्तात्रय माळी, मोतीराम काठे, प्रल्हाद माळी गौतम तिडके, मोहन तांबे, नाना शिंदे,शिवाजी तिडके, सुभाष तिडके, यांच्याश समता सैनिक उपस्थित होते.