23 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्ररेवदंडा म्हणजे, जणू माणसे घडविणारे विद्यापीठ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रेवदंडा म्हणजे, जणू माणसे घडविणारे विद्यापीठ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिंदे म्हणाले, धर्माधिकारी कुटुंबीय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करीत आहेत. ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे.

उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचे काम नानासाहेब आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले असून रेवदंडा म्हणजे, जणू माणसे घडविण्याचे विद्यापीठ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार दिल्यामुळे महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शिंदे म्हणाले, धर्माधिकारी कुटुंबीय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करीत आहेत. ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.

‘पाहिला जनांचा सागर भरली ज्ञानाची घागर’ असे सांगत जनांचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. ही आप्पासाहेबांची ताकद आहे.
या महासागरासमोर काय बोलावे, हे सुचत नाही. मी आज आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर आपल्या परिवारातला एक श्री सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी जनसागराला अभिवादन केले.

म्हणाले, ‘ प्रत्येक श्री सदस्य शिस्तीचे करत असतो आणि मला या ठिकाणी सांगावसं वाटतं की माझी पत्नी आणि मुलगा खासदार डॉ. श्रीकांत देखील या श्री सदस्यांमध्ये समोर बसलेले आहेत. हा जनसागर आप्पासाहेबांच्या प्रेमापोटी परवा रात्रीपासून याठिकाणी उपस्थित आहे.

राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते त्याचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. राजकीय अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, आशीर्वाद आणि प्रेरणा याठिकाणी लागते, त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. नानासाहेबांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता पण त्यांच्या निधनानंतर याच मैदानामध्ये आप्पासाहेबांनी स्वीकारला होता आणि त्याच मैदानामध्ये आज पुन्हा २०२२ चा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेबांना देण्यात आला हा योगायोग असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्यावेळेस माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यावेळी माझं कुटुंब उध्वस्त झालं होतं. त्यावेळेस मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी आधार दिला आणि आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन करून दिशा दाखवली. कुटुंब उध्वस्त होत असताना त्यांना वाचवण्याचे काम आप्पासाहेबांनी केले.

अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा दूर केल्या. मोह, माया, मत्सर यापासून दूर जाण्याची शिकवण त्यांनी दिली. सरकार म्हणून काम करीत असताना आम्ही देखील आप्पासाहेबांचे विचार आचरणात आणून सर्वसामान्य लोकांची सेवा करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

हे सुध्दा वाचा :

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार भारतात परत आणणार : सुधीर मुनगंटीवार

निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दातृत्ववान नेतृत्व; महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अर्पण

शिंदे सरकारचे म्हशीपेक्षा रेडकू मोठे !

ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते तशी माणसे जोडून माणुसकीचा महासागर आप्पासाहेबांनी निर्माण केला. अरे माणसा माणसा कधी व्हशील तू माणूस… या बहिणाबाईंना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आप्पासाहेबांच्या माणूस घडविण्याच्या याच कार्यातून मिळते. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, शिक्षण, मार्गदर्शन अशा सर्व मार्गांनी आप्पासाहेबांनी समाज घडविला. त्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान हे मला एखाद्या दीपस्तंभासारखे वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी