33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमुंबईमहाराष्ट्र भूषण : शिंदे सरकारच्या 42°© रणरणत्या उन्हातील इव्हेंटने घेतले 11 बळी

महाराष्ट्र भूषण : शिंदे सरकारच्या 42°© रणरणत्या उन्हातील इव्हेंटने घेतले 11 बळी

महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आप्पासाहेबांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांचा रणरणत्या उन्हात तब्बल 42°© उच्च तापमानाने 11 जणांचा बळी घेतला आहे. या सोहळ्यात लाखो अनुयायी जमतील हे साऱ्यांनाच माहिती होते. मुख्यतः शिंदे सरकारने ज्या पद्धतीने तयारी करायला हवी होती, ती फक्त VIP लोकांसाठीच केल्याचे दिसून आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो श्री सदस्य आले होते. त्या लाखोंची सोय न पाहता, केवळ गृहमंत्री अमित शाह यांची सोय पाहता भर दुपारच्या वेळेत ही सभा आणि सोहळा ठेवला गेला. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर ही दुर्घटना टळली असती, असे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी रविवारी खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11 वर गेला आहे. तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ आहेत. नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत. कडक उन्हात दोन तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने या श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यातील 11 जण दगावले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

उष्माघाताचा तडाखा बसलेल्यांवर नवी मुंबई, कळंबोली, कामोठे, परिसरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 जणांना उपचार करून डिशचार्ज देण्यात आला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्री यांनी मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत सुद्धा जाहीर केली आहे. पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम हा सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत भर उन्हात झाला. या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे उष्मघाताने या कार्यक्रमात लोकांचा जीव गेला असल्याचे आरोप होत आहे.

यावेळी “गृहमंत्री आणि VIP छपराखाली होते, पण श्रीसदस्य उन्हात होते. आम्हाला सोहळ्यावर टीका करायची नाही. राजकारण्यांनी श्रीसदस्यांचा अंत पाहिला”, असे अतिशय रोखठोक मत संजय राऊतांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात समोर ऊन्हात बसलेल्या लोकांचा विचार न करता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता त्यांचाच जास्त विचार करण्यात आला होता. आप्पासाहेब वगळता इतर सर्व राजकीय लोकांच्या कुरघोड्या सुरू होत्या. आप्पासाहेब यांना मानणारा समुदाय समोर बसला होता. त्यांना राजकारणाशी घेणंदेणं नव्हतं. पण राजकारण्यांनी त्या लोकांचा अंत पाहिला आणि त्यामुळे त्यांचा बळी गेला ही बाब दुर्दैवी आहे,” असा आरोप राऊतांनी केला.

पाच लाखाचे अर्थसहाय्य जाहीर

राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात जाहीर केली असून उपचार सुरू असलेल्यांचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या घटनेमुळे विरोधी पक्ष सरकारवर चांगलाच संंतापला आहे.

हे सुद्धा वाचा: 

महाराष्ट्र भूषण: डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या गौरव सोहळ्यात रणरणत्या उन्हात लाखोंचा जनसागर लोटला

निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दातृत्ववान नेतृत्व; महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अर्पण

अमित शाह मुंबईत; अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देणार

Maharashtra Bhushan: Shinde Sarkar’s 42°© event in the scorching heat took 11 victims, Maharashtra Bhushan, eknath Shinde, aappasaheb dharmadhikari, heat took 11 victims in maharashtra bhushan sohala

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी