25 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्र‘भाजप आम्हाला जितका त्रास देईल, तेवढे आम्हाला जास्त यश मिळेल’

‘भाजप आम्हाला जितका त्रास देईल, तेवढे आम्हाला जास्त यश मिळेल’

टीम लय भारी

मुंबई : जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे काल निकाल जाहीर झाले. त्यात ७० टक्के जागांवर ‘महाविकास आघाडी’च्या पक्षांना यश मिळाले आहे. भाजप आम्हाला जितका त्रास देईल, तितके आमचे यश वाढत जाईल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ( bjp bothers us, and we will succeed more said nawab malik)

महाराष्ट्रात सुद्धा पश्चिम बंगालसारखी स्थिती होणार आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांना कमालीचा त्रास दिला.

राष्ट्रवादीचे सर्व नेते निर्दोषच : जयंत पाटील

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात ‘महाविकास आघाडी’च्या तिन्ही पक्षांची भाजपवर मात !

तृणमूल काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला. परिणाम मात्र उलटाच झाला. भाजपला पश्चिम बंगालमध्ये अपयश आले. विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी स्वतःची ताकद सिद्ध केली. महाराष्ट्रात सुद्धा भाजपचा असाच सुपडासाफ होईल, असेही भाकीत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

भाजपचे नेते शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चालवतात. हे संतापजनक आहे. भाजपचा हा अन्याय सहन केला जाणार नाही. त्यामुळेच आम्ही येत्या ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये महाराष्ट्रातील जनता मोठ्या संख्येने सहभागी होईल, असेही मलिक म्हणाले.

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले : जयंत पाटील

‘भाजप आम्हाला जितका त्रास देईल, तेवढे आम्हाला जास्त यश मिळेल’

Maharashtra bandh on October 11 over Lakhimpur Kheri violence: Minister Jayant Patil

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी