28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवक्फ बोर्ड नावाखाली दादागिरी : आमदार नितेश राणे

वक्फ बोर्ड नावाखाली दादागिरी : आमदार नितेश राणे

वक्फ बोर्डाच्या नावाखाली देशभरात अप्रत्यक्ष प्रकारे दादागिरी सुरू आहे, जमिनी लाटल्या जात आहेत. त्यामुळे हे सर्व राेखण्यासाठी सर्व हिंदूं बांधवांनी सामूहिक लढा देण्याची आवश्यकता आहे.वक्फला विरोध करताना त्यांच्या जमिनींवर बिनधास्त मंदिरे बांधावी. राज्य व केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला.देशातून वक्फ कायदा-१९९५ रद्द करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे रविवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा माेर्चा सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी आ. राणे, सुरेश चव्हाणके, काजल हिंदुस्तानी, भारतानंद सरस्वती, आ.देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.

वक्फ बोर्डाच्या नावाखाली देशभरात अप्रत्यक्ष प्रकारे दादागिरी सुरू आहे, जमिनी लाटल्या जात आहेत. त्यामुळे हे सर्व राेखण्यासाठी सर्व हिंदूं बांधवांनी सामूहिक लढा देण्याची आवश्यकता आहे.वक्फला विरोध करताना त्यांच्या जमिनींवर बिनधास्त मंदिरे बांधावी. राज्य व केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला.देशातून वक्फ कायदा-१९९५ रद्द करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे रविवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा माेर्चा सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी आ. राणे, सुरेश चव्हाणके, काजल हिंदुस्तानी, भारतानंद सरस्वती, आ.देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.

आ. राणे यांनी संबोधित करताना जगातील इस्लामिक देशांमध्ये नसलेला वक्फ कायदा हा केवळ भारतामध्ये लागू आहे. या वक्फ कायद्याच्या माध्यमामधून देशाला इस्लामिक करण्याचे कारस्थान आहे. परंतु, ९० टक्के हिंदू असलेल्या भारतात हा प्रकार होऊ देणार नाही, असे राणे यांनी सांगितले.देशात केवळ भारतीय संविधान लागू असून, आम्हाला वक्फ कायदा मान्य नाही. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी राणे यांनी केली. प्रारंभी बी. डी. भालेकर मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. शालिमार, नेहरू गार्डन, एमजी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा पोहोचला. यावेळी माेर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते.
मोर्चावेळी सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर व्यासपीठ उभारण्यात आले. पहिल्या टप्प्यात पोलिसांनी अशोकस्तंभ ते सीबीएस असा एकेरी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सीबीएस येथून अशाेक स्तंभाकडे येणारी वाहने अन्य मार्गाने वळवली. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

मुंबईच्या मीरा रोड येथील घटनेनंतर तेथे बुलडोझर फिरविला.राज्य व केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. लवकरच मालेगाव येथील किल्ला परिसर भागातील अतिक्रमणे काढण्यात येऊन तेथे पोलिस चाैकी उभारण्यात येणार आहे. मालेगावला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यन्वित केले जाणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी