26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्र..अन्यथा पुन्हा मोर्चा काढू, बच्चू कडूंचा प्रहार!

..अन्यथा पुन्हा मोर्चा काढू, बच्चू कडूंचा प्रहार!

लय भारी न्यूूज नेटवर्क

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. सरसकट कर्ज माफी दयावी. ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आमदार बच्चू कडूंचा मोर्चा राजभवनावर धडकणार होता. मात्र, पोलिसांनी बच्चू कडूंना ताब्यात घेतलं. नंतर सुटका केली.

बच्चू कडू यांनी सुटकेनंतर आझाद मैदानात राज्यपालांवर प्रहार केला. यावेळी त्यांनी राज्यपालांनी किमान मदतीची घोषणा तरी करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा पाच दिवसानंतर पुन्हा न सांगता मोर्चा काढण्याचा इशारा दिला. पोलिसांनी नरिमन पॉईंट येथेच बच्चू कडू यांचा समर्थकांसबोतचा मोर्चा अडवला आणि ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

बच्चू कडू म्हणाले की, आपण पाच लोक घेऊन मंत्रालयात चाललो होतो, पण पोलिसांनी त्यासाठीही नकार दिला. सरकार नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पाच दिवसांत निर्णय दिला नाही तर न सांगता राजभवनावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी