29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमंत्रालयमुख्यमंत्र्यांवर 'मंत्री कपात' करण्याची वेळ येईल : संजय राऊत

मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्री कपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक मत व्यक्त केलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांवर मंत्रीकपात करण्याची वेळ येईल असं मत राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून व्यक्त केले आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल.

मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही असे मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा त्या अधिकाऱ्याने एक मिश्किल भाष्य केले. मंत्रालयातही अनेकांच्या हाताला काम नाही तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? करोनामुळे आय.ए.एस. आयपीएस अधिकाऱ्यांचा एक मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्क आहे. महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी