बोरीवली येथील आरे कॉलनीच्या विकासाच्या अनेक योजनांवर विधानसभात चर्चा झाली. संबंधित विभागाचे आमदार रवींद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर चर्चा झाली आणि यावेळी आरेच्या विकासा बाबत तीन जनांची कमिटी बनवण्याचा निर्णय राज्य सरकारने सभागृहात जाहीर केला आहे. (Aarey Colony Development 3 member committee constituted)
आरे कॉलनी हा एक महत्वाचा भाग मुंबईत आहे. हा भाग जंगलाला लागून आहे. या ठिकाणी हजारो आदिवासी लोक राहतात. त्याच प्रमाणे हा एक पिकनिक स्पॉट देखील आहे.मात्र, यानंतरही इथे अनेक दुरवस्था आहे. या भागाचे आमदार शिवसेनेचे रवींद्र वायकर हे आहेत. त्यांनीच लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. यावेळी वायकर यांनी दुरवस्थेचे अनेक मुद्दे मांडलेत.
ते म्हणाले, आरे कॉलनीत माती काढली जात असते, खोदकाम केलं जातं असत. ते तात्काळ बंद व्हायला हवं. इथला तलाव स्वच्छ नाही. तो पालिकेने स्वच्छ करायला हवा. पण पालिका त्यास नकार देत असते. या तलावात दरवर्षी चार हजार गणपतीच विसर्जन केलं जातं असतं.
आरे कॉलनीत 53 किलोमीटरचे रस्ते आहेत. त्याची दुरुस्ती केली जात नाही. या रस्त्यावर लोक चालू शकत नाही. इथे ओकला येणारे नागरीही त्रस्त आहेत. याबाबत त्यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात प्राशासन इतरांना कोर्टाने झपलं आहे. यानंतर ही सुधारणा झाल्या नाहीत. इथलं हॉस्पिटल बंद पडल आहे. ते कूपर हॉस्पिटलतर्फे चालवण्यात यावं, अशी मागणो रवींद्र वायकर यांनी केली. त्याच दखल घेऊन सरकार ने तात्काळ 3 जणांची तात्काळ समिती स्थापन करण्याच आश्वासन दिलं आहे. या समितीचा अहवाल येतील त्या प्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे आदेश राज सरकारने दिले आहेत.
हे सुद्धा वाचा :
Good News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन !