टीम लय भारी
मुंबई :– मुंबई पूर्व उपनरातील एम-पूर्व विभागा अंतर्गत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड गोवंडी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे आणि सदर उड्डाणपुल लवकरच तयार होण्याच्या पथावर आहे. उड्डाणपुलाचे नामकरण ‘श्री शरदचंद्र पवार उड्डाणपूल’ करावे, अशी लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अय्युब शेकासन यांनी मंत्री नवाब मलिक आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे विनंती केली आहे.
पूर्व उपनगरातील वाहतुकीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड वर उभारला जाणारा उड्डाणपूल हा मुंबई महानगरपालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. “महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात भरीव योगदान दिलेले माजी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांचे कैवार तसेच माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी पालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव अय्युब शेकासन यांनी केली आहे. या मागणीवर पालिकेच्या वतीने सकारात्मक विचार होऊन लवकरच ही मागणी पूर्णत्वास येईल, याची मला खात्री आहे” अशा शब्दांत अय्युब शेकासन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.