आज तुम्हाला महाराष्ट्रातून आणि मुख्यत्वे मुंबईतून बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या देशात तातडीने जायचे असेल तर मात्र तुमची तारांबळ उडू शकते. याचे कारण ठरलंय मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. मुंबई (महाराष्ट्र) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज (18 ऑक्टोबर) सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मुंबई विमानतळानुसार, त्याच्या दोन्ही धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. विमानतळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही दुरुस्ती पावसाळ्यानंतरच्या प्रतिबंधात्मक देखभालीचा भाग आहे. यामध्ये रनवे एज लाईट्सचे अपग्रेडेशन (AGL) आणि इतर अनेक कामांचा समावेश आहे.
मुंबई विमानतळानुसार दरवर्षी पावसाळ्यानंतर हे नित्याचे काम केले जाते. निवेदनानुसार, दररोज 800 विमाने विमानतळावर टेक ऑफ करतात आणि उतरतात आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दरवर्षी धावपट्टीची देखभाल केली जाते. विमानतळाचे म्हणणे आहे की एअरलाइन्सच्या ग्राहकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सहलींचे वेळापत्रक पुन्हा निश्चित करण्यात आले आहे जेणेकरून दुरुस्तीचे काम सहजतेने पूर्ण करता येईल.
हे सुद्धा वाचा
Breath Into The Shadow S2 : ‘या’ दिवशी प्राइम व्हिडिओचा ‘ब्रीद: इनटू द शॅडो’ सीझन 2 येणार!
SBI Bank Users : एसबीआयच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी! आता ईएमआयमध्ये होणार वाढ
या विमानतळाचे कामकाज अदानी ग्रुपच्या एका कंपनीच्या हातात आहे. विमानतळावर ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हरित ऊर्जा स्त्रोतांचा वापर केल्याचे विमानतळाचे म्हणणे आहे. विमानतळ तिथल्या 5 टक्के ऊर्जेची निर्मिती करतो, तर 95 टक्के जलविद्युत आणि पवन ऊर्जेतून तयार होतो आणि तिथून आयात होतो. मुंबई विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ आहे जे एप्रिलपासून पूर्णपणे हरित ऊर्जेवर काम करत आहे. यावर्षी विमानतळाने 10 किलोवॅट पीकची हायब्रीड सोलर मिल बसवली होती. त्यामुळे दररोज किमान 36 किलोवॅट सौर आणि पवन ऊर्जा निर्माण होते.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी मुंबई विमानतळावर 8 उड्डाणे वळवण्यात आली होती. हलका रिमझिम पाऊस आणि कमी दृश्यमानता हे त्यामागचे कारण सांगण्यात आले. त्या दिवसासाठी सर्व उड्डाणे रीशेड्युल करण्यात आली. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागलेल्या प्रवाशांना विमानतळावर अल्पोपहार देण्यात आला.
दरम्यान, आज (18 ऑक्टोबर) रोजी विमानतळावरील निसोजित काम सायंकाळी 5 वाजे पर्यंत पूर्ण केले जाईल. शिवाय त्यानंतर शक्य तितक्या लवकर विमानतळावरील सेवा सुरू केली जाईल आणि उड्डाने पूर्ववत केली जातील अशी आशा प्रवासी व्यक्त करत आहेत. तब्बल 6 तास विमानतळ बंद राहणार असल्याने अनेकांना या गोष्टीचा फटका बसणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.