टीम लय भारी
मुंबई: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शुक्रवार (ता.6) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महानगरपालिकेची सत्ताही वर्षानुवर्षे शिवसेनाकडे असूनही हा प्रश्न का मिटत नाही. जर मुंबईमधील एखादा प्रश्न मिटला तर यांच्या दुकानदाऱ्या बंद होतील असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर केला आहे (Sadabhau Khot attacked on Shiv Sena).
मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेकडे कायमस्वरूपी आहे. मात्र, मुंबईचे प्रश्न का मिटत नाहीत, दरवर्षी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला की मुंबई तुंबते, मुंबईत रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत. दरवर्षी मुंबईतील साफसफाईच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जातो. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शिवसेनेने ठोस पावले उचलायला हवीत असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
Video : आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ
जितेंद्र आव्हाडांनी दिली खुषखबर, सर्वसामान्यांसाठी 8,205 घरांची सोडत
धनंजय मुंडेंचा महत्वाचा निर्णय, तृतीयपंथियांची नोंदणी करणार
Shiv Sena-led MVA govt not serious about Maratha quota, says Fadnavis
मुंबईमध्ये अनेक इमारती या अनधिकृत आहेत. त्यामुळे इमारती कोसळून जीवितहानी होते. याला जवाबदार कोण, बिल्डरांना अनधिकृत इमारती बांधण्यासाठी परवानगी कोण देत. या अनधिकृत इमारतींमुळे मुंबईमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र शिवसेना हे प्रश्न सोडवत नाही, असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत (Sadabhau Khot said who would allow builders to build unauthorized buildings).