टीम लय भारी
मुंबई :- कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड काल म्हणाले होते की, पवार साहेब तुम्हाला पुन्हा एकदा मैदानात उतरावे लागेल. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का? असे म्हणत त्यांनी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे (Awhad dont you trust the Chief Minister? Sachin Kalyanshetti).
काल जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले, मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसींना न्याय देण्याचे काम शरद पवार साहेबांनी केले. साहेब ह्या वंचितांना न्याय द्यायला परत तुम्हाला मैदानात उतरावे लागेल #OBCReservation असा हॅशटॅग देत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला होता.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा
जितेंद्र आव्हाडांचे खडेबोल, आता सत्य बाहेर आले सरकार उघडे झाले
यानंतर, जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटला सचिन कल्याणशेट्टी यांनी ते रिट्विट करत म्हणाले, आव्हाडसाहेब, मंडल आयोग स्थापला मोरारजी देसाई सरकारने व अंमलात आणला व्ही. पी. सिंग यांनी! यात पवार साहेब कुठून आले? आणि पवार साहेबांना यात खेचताय, तुमचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? असा प्रश्न भाजप नेते सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे (Dont you believe in the leadership of the Chief Minister? This question has been asked by BJP leader Sachin Kalyanshetti).
आव्हाडसाहेब, मंडल आयोग स्थापला मोरारजी देसाई सरकारने व अंमलात आणला व्ही पी सिंग यांनी! यात पवार साहेब कुठून आले?
आणि पवार साहेबांना यात खेचताय, तुमचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? @BJP4Maharashtra https://t.co/SBI0VJKcfQ
— Sachin Kalyanshetti (@Kalyanshetti_S) June 28, 2021
ओबीसी आरक्षण मुद्यांवर आरोप प्रत्यारोप फेऱ्या सुरू आहेत. आरक्षण भाजपामुळे रद्द झाला. असा आरोप महाविकास आघाडी सरकार करत आहे. तर आरक्षण रद्द होण्यामागे महाविकास आघाडी सरकार आहे. असा आरोप भाजप करत आहे.