29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeराजकीयMaharashtra Politics : संदिपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंची केली 'नवरी'शी तुलना

Maharashtra Politics : संदिपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंची केली ‘नवरी’शी तुलना

शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी केलेल्या वक्तव्यात भुमरे यांनी ठाकरेंची तुलना एका नवरीशी केली आहे त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून तीव्र पडसाद उमटत आहेत. 

शिवसेनेत फुट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटाची एकमेकांवर शाब्दिक फटकाबाजी सुरूच आहे. कोणतीही सभा, कार्यक्रम असो एकमेकांवर टिकाटिप्पणी करण्यात हे सगळेच आतुर असतात, त्यामुळे सध्या राज्यात हा एकच गोंधळ जास्त पाहायला मिळत आहे. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, शिवसैनिकांनी शिंदे गटात जाण्यास धन्यता मानली आहे त्यामुळे शिंदे गटाची ठाकरे गटापेक्षा जास्त ताकद पाहायला मिळत आहे, तरीही न डगमगता ठाकरे गटाकडून शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्याची मोठी धडपड सुरूच आहे. दरम्यान शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी केलेल्या वक्तव्यात भुमरे यांनी ठाकरेंची तुलना एका नवरीशी केली आहे त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून तीव्र पडसाद उमटत आहेत.

अमरावती जिल्ह्यात ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’ निमित्त शिंदे गटाकडून सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाषणे झाली आणि या भाषणांमध्ये नेहमीप्रमाणे ठाकरे गटाला लक्ष करण्यात आले. मंत्री संदिपान भुमरे यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवत बोचरी टीका केली आहे. यावेळी या यात्रेच्या निमित्ताने भुमरे आणि खोतकर यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले. सदर मेळावा शहरातील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराच्या हॉलमध्ये पार पडला.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा गंभीर आरोप

Auto-Rickshaw and Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा भाडे महागले

PFI Activist Arrest: विद्येच्या माहेरघरात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा! व्हिडिओ व्हायरल

हिंदू गर्व गर्जना यात्रा’ निमित्त आयोजित यात्रेत शिंदे गटातील अनेकांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी संदिपान भुमरे यांनी खणखणीत भाषण केले आणि उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांवर शाब्दिक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी भुमरे म्हणाले, वर्षा बंगला सोडला तेव्हा एखादी नवरी कशी घर सोडते, तसे सोंग केले असे म्हणत ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. कधीकाळी शिवसेना, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दैवत माननारे भुमरे आज ठाकरेंवर पुर्णपणे उलटल्याचे दिसून येत आहेत.

पुढे संंदिपान भुमरे म्हणतात, मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहेत. कोणत्याच फाइलवर सही न करण्यास हे गोचीड सांगत होते. सही केली तर अडचणीत याल, असेही सांगत होते. त्यांच्यामुळे कोणाचेच काम झाले नाही असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर आरोप सुद्धा केला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते बिनबोभाटपणे ठाकरे गटावर टीका करत असल्याचे दिसून येत आहेत, त्यामुळे त्यांची आधीची निष्ठा आणि आताची निष्ठा यात नेमकं घोडं कुठे अडलं हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न वारंवार समोर येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी