32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयनाना पटोले यांचा भाजपवर घणाघात ,शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे असल्याचे भाजपकडून भासवले...

नाना पटोले यांचा भाजपवर घणाघात ,शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे असल्याचे भाजपकडून भासवले जाते

टीम लय भारी

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यांरी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने सभागृहात एकच गोंधळ झाला आणि या विरोधामुळे राज्यपाल आपले आभिभाषण सोडून गेले. या सर्व प्रकरणावरती पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.(Nana Patole lashes out at BJP)

पटोले म्हणाले, ‘राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी अभिभाषण केवळ 5 मिनिटात संपवले आणि सभागृह सोडलं. ते राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत. बेळगावमध्ये छत्रपतींची विटंबना करतात. स्वत: राज्यपाल अपमानास्पद वाक्य बोलतात. राज्यपालांनी जनतेची माफी मागावी, तसंच शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे असल्याचं भाजपकडून कायम भासवलं जातं, आणि हे आम्ही कधीही स्विकारणार नसल्याचं ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद बोलणं. ज्योतिबा फुले यांच्याबदद्ल बोलणं ते कसे बोलू शकतात. राज्यपालांनी महाराष्ट्रातून जावे, कोश्यारींना परत पाठवण्याबाबत आम्ही कायदेशीर तपासणी करत आहोत. दरम्यान, ‘नवाब मलिक यांच्यावर आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. मग इक्बाल मिर्चींचे पैसे कुणी घेतले. फडणवीसांनी आरोप करण्या आधी ते मुख्यमंत्री असताना किती आरोप केले त्यांनीच प्रत्येकाला क्लिन चिट दिली. अशी टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली.

हे सुद्धा वाचा

राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे : नाना पटोले

“हा भाजपाचा नवा धंदा”, नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरून नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप

मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले : नाना पटोले

At ‘Parivartan rally’, Nana Patole urges workers to bring Congress back to power in PMC

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी