32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeव्हिडीओबारामतीचे मतदार मुर्ख, बेअक्कल; अजितदादांचं थोर विकासकार्य त्यांच्या लक्षातच येत नाही

बारामतीचे मतदार मुर्ख, बेअक्कल; अजितदादांचं थोर विकासकार्य त्यांच्या लक्षातच येत नाही

बारामतीची जनता खरोखरच बावळट, बेअक्कल आणि मुर्ख आहे. त्यांच्या डोक्यात मेंदू नाही(Ajit pawar works for Baramati and Maharashtra). त्यामुळं या बेअक्कल व मेंदू नसलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्याचा ठेका अजितदादांनी घेतलाय. अजितदादांचं सगळं आयुष्य बारामतीचं कल्याण करण्यात गेलंय. अजितदादांच्या लहाणपणीची एक गोष्ट सांगतो. अजितदादांना खरंतर म्हशी राखायला ठेवायचं होतं. बारामतीच्या केव्हीकेमध्ये तशी तजवीजही करण्यात आली होती. पण अजितदादांचा स्वभाव लक्षात घेता म्हशी घाबरतील. म्हशी नाराज होतील. कारण म्हशींना मेंदू कमी असतो.

बारामतीची जनता खरोखरच बावळट, बेअक्कल आणि मुर्ख आहे. त्यांच्या डोक्यात मेंदू नाही(Ajit pawar works for Baramati and Maharashtra). त्यामुळं या बेअक्कल व मेंदू नसलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्याचा ठेका अजितदादांनी घेतलाय. अजितदादांचं सगळं आयुष्य बारामतीचं कल्याण करण्यात गेलंय. अजितदादांच्या लहाणपणीची एक गोष्ट सांगतो. अजितदादांना खरंतर म्हशी राखायला ठेवायचं होतं. बारामतीच्या केव्हीकेमध्ये तशी तजवीजही करण्यात आली होती. पण अजितदादांचा स्वभाव लक्षात घेता म्हशी घाबरतील. म्हशी नाराज होतील. कारण म्हशींना मेंदू कमी असतो. म्हशीपेक्षा थोडासा जास्त मेंदू असलेल्या बारामतीकरांचं कल्याण फक्त आपणंच करू शकतो, याचा साक्षात्कार अजितदादांना लहानपणीच झाला. म्हणून ते शरद पवारांकडे गेले, अन् मुळूमुळू रडू लागले. मला बारामतीचा विकास करायचाय. तुम्ही मला राजकारणात संधी द्या, असा बालहट्ट अजितदादांनी शरद पवारांकडे धरला. बिनाबापाचं पोरगं. त्याला नाराज कसं करायचं. म्हणून शरद पवारांनी पहिल्यांदा खासदारकी, अन् आमदारकी, मग राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा एकामागोमाग एक संधी दिल्या. शरद पवारांना राजकारण, विकास यातलं काहीच कळत नाही. बारामतीच्या विकासात तर शरद पवारांच काहीच योगदान नाही. बारामतीचा जो काही विकास झालाय तो सगळा अजितदादांनीच केलाय.

पण अजितदादांच हे भलंमोठं कार्य लोकांच्या लक्षात येईना. लोकं उगीचच अजितदादांच डोकं तापवतात. एकतर अजितदादांच्या डोक्यावरची केसं गेलीत. केसं गेल्यामुळं टक्कल पडलंय. त्या टकलावर तेल लावल्यामुळं ते तुळतुळीत दिसतं. उन्हातान्हात प्रचार करीत असताना डोकं कितीतरी जाम तापतं. अशा तापलेल्या डोक्यानं प्रचार करायचा, हे अवघड काम आहे. डोक्यावर केस असतील तर उन्हापासून संरक्षण मिळतं. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही पूर्वी असंच टक्कलं होतं. आपण हिंदु धर्मात असल्याचा साक्षात्कार उदय सामंत यांना झाला, अन् त्यांनी दुसरं लग्न केल. ते सुद्धा एका अभिनेत्रीशी. पुरूषाने दोन लग्न केली पाहीजेत, हे हिंदू धर्माच्या कुठल्या तरी ग्रंथात लिहलेलं आहे. त्यामुळं त्यांनी दुसरं लग्न केलं. अन् चमत्कार बघा सामंतांच्या डोक्यात केसं उगविली.

अजितदादांनाही हे हिंदू धर्मातील थोर कार्य कुठल्या तरी साधूनं सांगितलं. मग त्यांनी औंधाच्या देवीच्या दर्शनासाठी जायला सुरूवात केली. त्यांनाही दुसरं लग्न करायची इच्छा होती. पण बहुधा औंधाच्या देवीनं कौल दिला नाही. त्यामुळं दादांच्या डोक्यात केसं उगविली नाहीत. औंधांची देवी फार प्रसिद्ध आहे. तुम्हांस माहितच असेल. माहित नसेल तर नक्की औंधाला जाऊन या. दुसरं लग्न न करण्यामागे सुद्धा अजितदादांचा मोठा सामाजिक हेतू होता. मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे. पुरूषांचा जन्मदर वाढत चालला आहे. १००० पुरूषांमागे ८०० मुली जन्माला येत आहेत. अशा परिस्थितीत अजितदादांनी दुसरं लग्न केलं, तर महिलांचा मोठा तुटवडा निर्माण होईल. तरूणांना मुलीच मिळणार नाहीत. मग महाराष्ट्रात पावलोपावली द्रौपदीसारखं वस्त्रहरण होईल. त्यामुळंही त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. सध्या अजितदादांचं डोकं तापलेलं आहे. अशातच दुसऱ्या बाजूला त्यांच्या खांद्यावर बारामती व महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी येवून पडलेली आहे. त्यांना अन्य कुणी साथ देत नसल्याने अजितदादांचे दोन्ही खांदे या जबाबदारीमुळं वाकले आहेत. पण तरीही गेल्या वीस – पंचवीस वर्षात ते विकासाचं काम जोमानं करताहेत.

मध्यंतरी विधानसभेत सतेज पाटलांनी पीएचडीधारक तरूणांचा प्रश्न मांडला होता. या पीएचडीधारक तरूणांना दिवे लावता येत नाहीत. त्यामुळं त्यांना कशाला फेलोशिप पाहीजे. जर अशा पोरांनी पीएचडी केली तर ते संधोशन करतील. संशोधनातून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. नवनवीन सोध लावतील. अगदी बल्ब, ट्यूबचा सुद्धा शोध लावतील. महाराष्ट्रात न्यूटन, आईनस्टाईन उदयाला येतील. पण याचा काही उपयोग आहे का सांगा. पीएचडी करणाऱ्यांना दिवे लावता आले पाहीजेत. पूर्वीच्या काळात लोकं बाटलीमध्ये रॉकेल भरायचे. त्यात सायकलची पुंगळी घालायचे. त्या पुंगळीतून सुताची वात काढली जायची. ती सुताची वात पेटवली की त्यातून मिणमिणता प्रकाश पडायचा. अशा अंधुकलेल्या प्रकाशात अभ्यास करता आला पाहीजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असाच अभ्यास केला होता. आताच्या पोरांना असे दिवे लावता येत नाहीत. दिवे लावता आले पाहीजेत, हा उदात्त विचार अजितदादांनी मांडला. सॉक्रेटीस, नेपोलियन, माओ यांच्यानंतर इतका उदात्त विचार मांडणारा तत्ववेत्ता म्हणून अजितदादांचेच नाव भविष्यात घेतले जाणार आहे. हा विचार महाराष्ट्राच्या भल्याचा आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहीजे.

अजितदादांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही समजला नाही एवढा मोठा दिव्यांचा विचार महाराष्ट्रासमोर मांडून ठेवला. हे किती मोठं इनोव्हेशन आहे. शिवाजी महाराजांनाही जे जमलं नाही, ते आता अजितदादा करताहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली. अन् त्यासाठी सगळ्या लोकांशी पंगा घेतला. औरंगजेब, आदिलशाह, निजाम, पोर्तूगिज यांना शिवाजी महाराजांनी सळो की पळो करून सोडलं. पण जर विकास करायचा असेल तर अशी मोठाल्या सत्ताधाऱ्यांशी दुश्मनी करायची नसते. पुरंदरचा तह अजितदादांना लहानपणापासूनच माहित आहे. ते लहान असताना विजय शिवतारे यांच्यासोबत पुरंदरला गोट्या खेळायचे. गोट्या खेळत असतानाच पुरंदरच्या तहाबद्दल त्यांनी माहिती मिळविली होती. ४०० वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबाने तह केला होता. त्यानुसार शिवाजी महाराज दिल्लीच्या औरंगजेबाच्या दरबारात गेले होते. तिथं औरंगजेबानं शिवाजी महाराजांना दुय्यम स्थान दिलं. म्हणून शिवाजी महाराज खवळले. त्यांनी औरंगजेबासमोर मान खाली घातली नाही. त्यांनी ताठ मान ठेवून मराठी बाणा दाखवला. त्यामुळं औरंगजेबानं शिवाजी महाराजांना तुरूंगात टाकलं. शिवाजी महाराजांनी त्यावेळी दुय्यम स्थान स्विकारायला हवं होतं. दिल्लीश्वरासमोर शिवाजी महाराजांनी नाक घासायला हवं होत, अशी भावना अजितदादांची झालेली आहे. शिवाजी महाराजांना दिल्लीश्वरांनी जहागिरी दिली असती. पण शिवाजी महाराजांनी हे सगळं केलं नाही. दिल्लीसमोर ते झुकले नाहीत. त्यांनी मराठी बाणा दाखवला. त्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालं. नाहीतर शिवाजी महाराजांच्या काळातच महाराष्ट्राचा विकास झाला असता. यातून अजितदादांनी धडा घेतला. दिल्लीश्वरांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचं लचांड अजित पवारांच्या मागं लावलं. दिल्लीश्वर आपल्याला तुरूंगात डांबणार असं अजितदादांच्या लक्षात आलं. मग त्यांना लगेचच शिवाजी महाराज आठवले. शिवाजी महाराजांनी जी चूक केली, ती आपण करायची नाही. पुरंदरचा तह वेगळ्या पद्धतीने करायचा, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं अजितदादांनी दिल्लीश्वरांच्या पुढं शरणागती पत्करली. किंबहूना त्यांनी दिल्लीश्वरासमोर शरणागती पत्करून, नाक रगडून उपमुख्यमंत्री हे दुय्यम असलेलं पद घेतलं. कारण स्वतःच्या मनाचा राजा होण्यापेक्षा दुश्मनाकडून मिळालेली जाहागिरी मोलाची असते हे त्यांच्या लक्षात आलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी