टीम लय भारी
मुंबई :- आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना 18 जून 2021 रोजी अर्ज पाठवला होता. त्या अर्जास उत्तर देत शासनाने 2 लाखापेक्षा जास्त जागा रिक्त असल्याची माहिती दिली आहे (Government responds to RTI activist Anil Galgali application).
महाराष्ट्र सरकारचे शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ही पदे रिक्त असल्याचे समजते. एकूण 29 विभाग आहेत व यात 16 असे विभाग आहेत ज्याची माहिती अद्ययावत नाही. यात गलगलींनी मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांसोबत गटनिहाय जिल्हापरिषदेतील गट या गट ‘ब’ गट ‘क’ गट ‘ड’ यातील 2019 पर्यंत ची माहिती मागितली होती आणि ती शासनाने दिली आहे.
मुंबईतील वाहनतळांच्या उपलब्धतेबाबत आता माहिती मिळवा या ऍप वर
नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला
29 शासकीय विभागात मंजूर पदांची संख्या 10,99,104 इतकी आहे. यात 8,99,211 पदे भरलेली आहेत आणि 2,00,193 एवढी पदे अजूनही रिक्त आहेत. यात गृह विभागाची 4 खाती, 3 खाती महसूल व वन विभागाची तसेच वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग, सामाजिक विभाग, न्याय विभाग व नगरविकास विभाग उद्योजक विभाग, कौशल्य विकास व ग्रामविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मृदा व जलसंसाधन विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग इतकी आहेत.
पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : या विभागाने केली कारखान्यावर मोठी कारवाई
RTI Response Shows Media Reports of Delays in Vaccine Procurement Were Accurate
एवढी रिक्त पदे असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होतो, त्यांची भरती लौकरात लौकर केल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. असेही अनिल गलगलींनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अर्जात म्हंटले होते (Anil Galgali had said in his application to the Chief Minister).