टीम लय भारी
लॉर्डस : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांच्या मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहेत. यातील पहिल्या कसोटी मालिकेत पावसामुळे भारताच्या विजयावर पाणी फेरले . परंतु दुसऱ्या मालिकेत भारताने 298 धावा करत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे या विजयात भारताच्या गोलंदाजांचा खारीचा वाटा आहे (India have taken a 1-0 lead with 298 runs).
भारतीय गोलदाजांनी इंग्लंडच्या 5 फलंदाजांना शून्यावरच माघारी पाठवले होते. इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज आर. बर्नस आणि डी. सिबली यांना शून्यावर समाधान मानावे लागले. भारताचे धडाकेबाज फलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शम्मी या दोघांनी हे विकेट्स घेतले आहेत.
कहाणी आग्र्याच्या सुटकेत शिवरायांसाठी जीवाची बाजी लावलेल्या दोन शिलेदारांची
LayBhari Special : बाळासाहेब थोरातांनी मिळवले, ते वर्षा गायकवाडांनी घालवले
त्याचबरोबर सॅम करण, जे. अँडरसन आणि एम. वूड या तिघांनाही शून्यावरच समाधान मानावे लागले. सॅमचा आणि अँडरसनचा विकेट मोहम्मद सिराजने घेतला , तर वूड मात्र शूण्यावरच नाबाद राहिला.
भारतीय संघ
लोकेश राहुलला सामनावीर पुरस्कार मिळाला असून त्याला दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या डावात 129 धावांची खेळी केली तर दुसऱ्या डावात 5 धावा केल्या. रोहीत शर्माने 21 धावा, चेतेश्वर पुजाराने 45 धावा तर कोहलीने 20 धावा केल्या.
अजिंक्य रहाणे याने अर्धशतक करत 61 धावा केल्या. तसेच रिषभ पंतने 22 धावा, जडेजा 3 धावा, तर इशांत शर्माने 16 धावा केल्या. उत्कृष्ट कामगिरी करत ज्यांनी इंग्लंड समोर मोठे आव्हान उभे करण्यास मदत केले ते म्हणजे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शम्मी. शम्मीने नाबाद 56 धावा केल्या तर बुमराहने नाबाद 34 धावा केल्या. विकेट्समध्ये बुमराहने 3 , मोहम्मद शम्मीने 1, सिराजने 4 आणि ईशांत शर्माने 2 विकेट्स घेतले.
आदित्य ठाकरेंनी केले EV पार्किंग चे उदघाटन
Best Memes On Twitter After India’s Epic Win vs England At Lord’s
इंग्लंड संघ
इंग्लंड संघाने एकूण 120 धावा केल्या. यामध्ये हाम्मीदने 9 धावा, जो. रुटने 33, बेअरस्टोने 2 धावा केल्या. तसेच बटलरने 25 धावा, मोईन अलीने 13 आणि रोबिन्सनने 9 धावा केल्या. रॉबिन्सनने 2 , वूडने 3, करणने 1, तर मोईन अलीने 2 विकेट्स घेतले.