29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
HomeराजकीयJaykumar Gore | वाळू माफिया - अधिकाऱ्यांचे रॅकेट, शेतकऱ्यांना डोकेदुखी

Jaykumar Gore | वाळू माफिया – अधिकाऱ्यांचे रॅकेट, शेतकऱ्यांना डोकेदुखी

जयकुमार गोरे यांनी अनेक समाजकंटकांना सोबतीला ठेवले आहे(Jaykumar Gore | Sand Mafia - Officials' Racket, Farmers' Headache). गोरे यांच्या पक्षातर्फे काम करणारे अनेकजण वाळू माफिया म्हणून काम करीत आहेत. दीपक बनगर, किरण जाधव असे अनेकजण आहेत, जे माणगंगा नदीतून वाळू उपसा करीत आहेत. हा वाळू उपसा करताना त्यांनी नदीपात्राच्या बाहेर जावून जमीन पोखरून काढली आहे.

जयकुमार गोरे यांनी अनेक समाजकंटकांना सोबतीला ठेवले आहे(Jaykumar Gore | Sand Mafia – Officials’ Racket, Farmers’ Headache). गोरे यांच्या पक्षातर्फे काम करणारे अनेकजण वाळू माफिया म्हणून काम करीत आहेत. दीपक बनगर, किरण जाधव असे अनेकजण आहेत, जे माणगंगा नदीतून वाळू उपसा करीत आहेत. हा वाळू उपसा करताना त्यांनी नदीपात्राच्या बाहेर जावून जमीन पोखरून काढली आहे.

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका

शेताला भगदाडे पाडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. महादेव कलढोणे नावाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या. पण प्रांत, तहसिलदार, पोलीस दखल घेत नाहीत. वाळू माफियांना आर्थिक दंडाच्या नोटीसाही पाठवल्या आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे शेतकऱ्यांनी ‘लय भारी’ला सांगितले. आमदार जयकुमार गोरे हे संविधानाला अभिप्रेत असा कारभार करीत नाहीत. वाळू माफियांसारखे समाजकंटक उघडपणे त्यांचे काम करीत असतात. जयकुमार गोरे यांचे दररोज एकेक कारनामे समोर येत आहेत.

Jaykumar Gore | ८५ वर्षाच्या निरक्षर आजीने केली इंग्रजीमध्ये स्वाक्षरी | जयकुमार गोरेंचा प्रताप

राज्य सरकारचे ‘गाळयुक्त शिवार अभियान’ ही योजना आहे. या योजनेनुसार 10 ऑगस्ट रात्रीपर्यंत म्हसवड जवळ असलेल्या राजवाडी धरणातून गाळ उपसण्याची परवानगी होती. 10 ऑगस्ट रोजी ची मुदत संपलेली आहे. लय भारी ने 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता राजवाडी धरणात धडक दिली. या ठिकाणी माफिया बेकायदेशीरपणे बिन धडकने गाळ उपसणे आढळले. पोकलेन, जेसीबी, डंपर, ट्रॉली अशी वाहने मोठ्या प्रमाणात दिसून आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी यांनी गाळमाफिया आणि पोलीस महसूल खाते यांच्यात कसे साटे लोटे आहे हे सांगितले. या माफी यांच्या मुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. गाळमाफी यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. माफिया शेतातील गाळ बिनधास्तपणे उपसत आहे गाळ शेतकऱ्यांसाठी दिला जात नाही त्याऐवजी तो वीटभट्ट्यांना वापरला जातो. शेतकऱ्यांचे नाव हित मात्र माफियांचे असे धोरण स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी