टीम लय भारी
पुणे: भारताच्या 75व्या स्वातंत्रदिना निमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील कौन्सिल हॉल येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी राज्यापाल कोश्यारी म्हणाले, अजित पवार हे माझे मित्र आहेत (Governor Koshyari said Ajit Pawar is my friend).
ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर राज्यपाल कोश्यारी हे उपस्थित मान्यवरांच्या भेटीगाठी घेत असताना काँग्रेसचे विधान परिषदेतील नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत प्रश्न विचारला.
राज्यपालांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी; काँग्रेसचा हल्लाबोल
अजित पवारांच्या पुतणीचे आज लग्न, विवाहस्थळ बंगळुरू !
यावेळी राज्यपालांच्या मागे अजित पवार उभे होते. त्यांच्याकडे हात करत राज्यपाल म्हणाले, ‘ते माझे मित्र आहेत. ते आग्रह धरत नाही, सरकार आग्रह धरत नाही. तर तुम्ही का आग्रह धरता?’ असे म्हणताच अजित पवार यांच्या चेहऱ्यावर देखील स्मितहास्य उमटले (Ajit Pawar also had a smile on his face after the Governor speech).
दरम्यान, राज्यपालांच्या या विधानाबाबत अजित पवार यांना विचारले असता, त्यावर अजित पवार हसत-हसत म्हणाले, ‘आज स्वातंत्र्य दिन आहे. या विषयावर नंतर बोलेन’ असे अजित पवार म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खोडसाळपणा, राष्ट्रवादीने फटकारले
गिरीश बापट यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला चिमटा
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बापट म्हणाले की, राज्यपालच म्हणत आहेत सरकार आग्रह धरत नाही. याचा अर्थ आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढला आहे (Girish Bapat criticizes Mahavikas Aghadi government).