30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे भूमिका बदलतात हे आता लोकांच्या लक्षात आलंय : जयंत पाटील

राज ठाकरे भूमिका बदलतात हे आता लोकांच्या लक्षात आलंय : जयंत पाटील

टीम लय भारी 

सांगली : जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी राज ठाकरेंवर निशाना साधला आहे. राज ठाकरे सतत राजकीय भूमिका बदलतात. या भमिकांच्या मागे वेगवेगळी कारणे असतात. ठाकरे हे सतत भूमिका बदलतात हे राज्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. Jayant Patil criticize Raj Thakre

त्यामुळे लोक ते जे करतात ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. राज ठाकरे आपल्या सभांमध्ये चांगल्या नकला करतात. हे पाहण्यासाठी त्यांच्या सभांना गर्दी होते. लोक गांभीर्याने घेतं नाहीत याच आत्मचिंतन करण्याची गरज राज ठाकरेंना (Jayant Patil) आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मागच्या काही सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसचे राष्ट्रवादीचे नेते यांच्यावर जोरदार टीका होती. राज यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनसुद्धा उत्तर दिलं जातं आहे.

हे सुद्धा वाचा :

‘काश्मीर फाईल्स’चे प्रमोशन करणारे पंतप्रधान राहुल भट च्या हत्येवर गप्प का? : सचिन सावंत

This One’s Different, Congress Insiders Say On 3-Day Strategy Camp

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी