टीम लय भारी
मुंबई : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवरून सकाळपासून सोशल मीडियावर ट्विट आणि प्रतिक्रियांना पेव फुटले आहे. (Jayant Patil expressed over Zilla Parishad by-election)
हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
ग्रामीण भारतात लवकरच ५ जी नेटवर्क येणार
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालांतून महाविकास आघाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८५ पैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत, ज्यात राष्ट्रवादी पक्षाने जवळपास १९ जागा जिंकल्या आहेत. असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
हा आनंद व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालांमधून दिसते. या पुढील निवडणुकांत देखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल असा मला विश्वास आहे.
UIDAI ने उघडली देशभरात 166 आधार सेवा केंद्रे, पाहा कोणती कामे होणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पाहता, जिप निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला आहे. तर तीन पक्षांशी लढत असूनही पंचायत समितीतही भाजपाची कामगिरी दमदारच झालेली आहे. निकालाबद्दल मतदारांचे आभार, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागू.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 6, 2021