टीम लय भारी
मुंबई : दि. ८ जुलै २०२२ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून ९२ नगर परिषद आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत. पण या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असल्याचेही यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
याबाबतची माहिती जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. छगन भुजबळ पहिल्या दिवसापासून स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून इम्पिरिकल डेटा गोळा करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम आहे.@NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 9, 2022
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा अट्टहास करू नये. महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. आणि ओबीसी समाजाला आरक्षण पण मिळेल, असेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते @ChhaganCBhujbal साहेब पहिल्या दिवसापासून स्वतः यात जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांटिया आयोगाने इम्पिरेकल डेटा गोळा करून अहवालही तयार केला आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 9, 2022
हे सुद्धा वाचा :
संजय राऊतांचा बंडखोरांना टोला, ५० कोटी पचणार नाहीत
एकनाथ शिंदेंचा विचित्र निर्णय, सधन वर्गाला खुष करण्यासाठी वंचितांना चिरडले
चित्रा वाघ नरेंद्र मोदींवर भडकल्या, गॅस दरवाढीवरून जाम संतापल्या !