धनश्री धुरी : टीम लय भारी
मुंबई : खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पहिलं ऑलिम्पिक पदक होते. खाशाबा यांना कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळाले होते. परंतु ज्या वेळी खाशाबा जाधव यांना पदक मिळाले होते त्या वेळी त्यांच्या यशात सामील व्हायला त्यांच्याबरोबर कोणीही भारतीय व्यक्ती नव्हती ( Khashaba Jadhav was India’s first individual medalist in the Olympics).
सन 1952 मध्ये फिनलँडच्या हेलसिंकी येथे ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला जागतिक स्तरावर आपली नवी ओळख बनवण्याची ही सुवर्ण संधी होती. खाशाबा यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे भारताला कुस्तीमध्ये पहिले वैयक्तिक कांस्य पदक मिळाले होते.
बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली
गोपीचंद पडळकर यांनी आता सर्वोच्च न्यायालयाच्याही विरोधात दंड थोपटले
ऑलिम्पिक स्पर्धा संपायला 2 ते 3 दिवसच बाकी होते. खाशाबा यांच्या सोबत आलेल्या भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा झाल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवाण प्रताप चंद यांना हेलसिंकी शहर पाहण्याची घाई झाली होती. इतरांचीही शहर फिरण्याची तीव्र इच्छा होती.
फिरण्याच्या नादात प्रताप चंद खाशाबा यांच्या सामन्याचा दिवसही विसरून गेले होते. त्यांनी स्वतःच खाशाबा यांना आपल्या सोबत फिरायला येण्यासाठी सांगितले. परंतु , खाशाबा यांनी फिरायला येण्यासाठी नकार दिला. ते इतरांचे कुस्तीचे सामने बघण्यासाठी मैदानाकडे गेले.
इतर दोन पैलवानांचा सामना सुरू होता. त्यावेळी खाशाबा यांना ध्वनीक्षेपक यंत्रातून एक आवाज आला. खाशाबा यांना इंग्रजी समजत नव्हते, परंतु जाधव हे आडनाव त्यांना कळले. त्यांनी पुढे जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की पुढचा सामना हा त्यांचाच आहे.
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात… भारतीय गोलंदाजांकडे सर्वांचे लक्ष
खाशाबा यांच्याबरोबर त्यावेळी भारतीय संघातील कोणीही नव्हते. त्यांनी कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या खेळाडूंवर मात केली , आणि भारताला पदक मिळवून दिले. ( Khashaba won the Bronze medal for India)
ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी खाशाबा यांनी स्वतःचे घर गहाण ठेवले होते
जेव्हा हेलसिंकी येथे ऑलिम्पिक खेळण्यासाठी जायचे होते तेव्हा खाशाबा यांच्याकडे पैसे नव्हते. तिथे जाण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गावातून उधार घेतले होते. तसेच स्वतःचे घरही गहाण ठेवले होते.