टीम लय भारी
अहमदनगर : ‘महाविकास आघाडी’ सरकार जाईल व आपले सरकार येईल, असे भाजपला सारखे वाटत आहे. पण आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. भाजपने दिवास्वप्ने पाहू नयेत, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे ( Balasaheb Thorat advised to BJP leader ).
अहमदनगरमधील एका कार्यक्रमानंतर थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पद्म पुरस्कारांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. त्यावर थोरात म्हणाले की, मंत्रीमंडळाचे कोणतेही सदस्य या समितीचे सदस्य असतात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना अध्यक्षपद दिले म्हणून त्यात काहीही गैर नाही. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे कुणीही राजकारण करू नये असाही सल्ला थोरात यांनी विरोधकांना दिला ( Balasaheb Thorat slams to BJP leaders ).
हे सुद्धा वाचा
बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा
बाळासाहेब थोरात सोलापूरसाठी उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकणार
VIDEO : दूध दराबाबत निर्णय घ्यावाच लागेल, पण… : बाळासाहेब थोरात
देवेंद्र फडणविसांना जमले नाही, ते आदित्य ठाकरेंनी करून दाखविले
‘महाविकास आघाडी’चे ४५ आमदार फुटीच्या मार्गावर
राजेश टोपे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांवर नाराज
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्यात आले आहे. अशातच आता पद्म पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदावरून ठाकरे यांना विरोधकांनी ‘लक्ष्य’ केले आहे. त्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली ( Balasaheb Thorat defend to Aaditya Thackeray ).
Breaking: पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, ५ सप्टेंबरपर्यंत नवी मुदत https://t.co/9X5wHLglp2 @OfficeofUT @CMOMaharashtra @DGPMaharashtra @MumbaiPolice @PuneCityTraffic @CPMumbaiPolice @SataraPolice @PuneCityPolice @PCcityPolice @Navimumpolice @ThaneCityPolice @PawarSpeaks
— Lay Bhari (@LayBhari3) August 14, 2020