टीम लय भारी
मुंबई: हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी केली आहे. जेव्हा हिंदुस्तानातल्या मुसलमान राजवटीत हिंदू संस्कृती, मंदिरं फोडली जात होती, तेव्हा हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी याच हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, मंदिरांचा जिर्णोद्धार केला.
म्हणून सर्व अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की, ज्या भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर असे करावे, असं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे असं त्यांनी म्हटले आहे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध असं म्हणत महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे.
या व्हिडीओच्या माध्यामातून त्यांनी (gopichand padalkar) पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मुंबई बॉम्बस्फोट मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागेदारी असणारा नवाब मलिक याचे पालन करणारे शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पध्दतीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे जाण्यापासून रोखण्यात आले. आपल्या नातवाला लॉन्च करण्यासाठी आमच्या प्रेरणास्थळाचा वापर केला अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा:
लोकप्रिय गायक केके यांनी संगीतक्षेत्राला काय दिले याचे विश्लेषण करणारी हेमंत देसाई यांची पोस्ट
“Arrest All Of Us”: Arvind Kejriwal On Cases Against Delhi Ministers