टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येत्या रविवारी १४ मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकली होती. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. परंतु परीक्षा पुढे ढकल्यामुळे संपूर्ण राज्यात विद्यार्थांमध्ये संतापाची लाट उसळली आणि विद्यर्थी रस्त्यावर उतरले.
२१ मार्चला #MPSC परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत.
👉 सर्वप्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण व पारदर्शक प्रक्रिया जाहीर करुन संभ्रमावस्था दूर करावी.
👉 २१ मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी. pic.twitter.com/UUzVAy7Nek— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 12, 2021
२१ मार्चला एमपीएससीची परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी स्वागत केले आहे. सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, सर्वप्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण व पारर्दशक प्रकिया जाहीर करून संभ्रमावस्था दूर करावी. तसेच २१ मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी.