29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्र'बाळासाहेब ठाकरे यांना अश्रू अनावर झाले असतील'

‘बाळासाहेब ठाकरे यांना अश्रू अनावर झाले असतील’

टीम लय भारी

मुंबई: संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ऑफर देण्यात आली. मात्र संभाजीराजेंची अट नकारली.  शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका असणार? असा सवाल उपस्थित केला जात होता.

मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale)  यांनी संभाजीराजेंनी घेतलेल्या पत्रकार परिषद भाष्य केले आहे. गजानन काळे  यांनी ट्विट करुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

काळे म्हणतात की, छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते.उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल.आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत. अशी टीका मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही :  गोपीचंद पडळकर

Eviction Proceeding Initiated Against Bhagwant Mann For ‘Unauthorised’ Occupation Of MP’S Flat In Delhi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी