टीम लय भारी
मुंबई : दस-याच्या मुहुर्तावर (Dasara) आपण एकजुटीने कोरोनारुपी रावणाचा नाश करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच कोरोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास दस-याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला दस-याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 24, 2020
विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा देणारा दिवस. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दस-याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन आपण विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 24, 2020
महा विजयादशमी! #दसरामेळावा
उद्या सायं. ६:०० वा.
लाइव्ह पहा: https://t.co/UDWbiXJ1J1 pic.twitter.com/siLoQ2mGh6
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 24, 2020
लढवय्या महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यातही आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकवटलो आहोत. कोरोनाच्या संकटात निसर्गाचीही अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगमगता आपण सामोरे जात आहोत. कोरोना विषाणूला पराजित करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून कोरोना विषाणूचा पाठलाग करुन त्याला रोखण्यासाठी कोरोना योद्धे काम करत आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांनी खूपच संयम दाखवला आहे. सर्व धर्मीयांनी आपले सण आणि उत्सव घरीच साजरे केले. विजयादशमी अर्थात दस-याचा सण आपण साजरा करणार आहोत. दसरा हा सण संकटांवर, वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी सीम्मोलंघन करुन विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आपण दसरा उत्साहात साजरा करत असतानाच कोरोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे असेही मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे.