टीम लय भारी
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेमुळे भाजपाची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. ही यात्रा पुन्हा एकदा सुरु करत नारायण राणेंनी रत्नागिरीत जोरदार प्रचार करायला सुरुवात केली आहे (Narayan Rane started campaigning vigorously in Ratnagiri).
यावेळी राणेंनी स्वतःच्या अटकेवर भाष्य केले. एखाद्या दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली असे राणे म्हणाले. त्याचबरोबर केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी दोनशे – अडीचशे पोलिसांना पाठवले होते. असे म्हणत राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’
सांस्कृतिक वारसा स्पर्धेत मराठमोळ्या सौंदर्यवतींची बाजी
मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाचा विसर, मनसेने करून दिली आठवण
Maharashtra News LIVE Updates: Narayan Rane resumes Jan Ashirwad Yatra
माझा आवाज खणखणीत होऊ दे मग सगळ्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढतो असे ही राणे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आंबा आणि काजू बागायतदारांचा विकास करणार असे आश्वासन ही राणे यांनी कोकणवासीयांना दिले (Rane assured the people of Konkan that he would develop mango and cashew cultivators).