टीम लय भारी
नवी दिल्ली :- मोदींना सत्तेत येऊन साडेसात वर्ष झाली आहेत. साडेसात वर्षा होऊनही तरुणांना दिलेले आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केले नाही. मोदींनी तरुणांचे भविष्य अंधकारात खेचुन त्यांना आत्मनिर्भर बनवले. मोदींनी तरुणांना रिक्षा चालवायला, मजुरी करायला आणि भजी तळायला भाग पाडले आहे. अशी खोचक टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर केली आहे (Congress leader Rahul Gandhi has sharply criticized Modi).
देशातील तरुणांना रोजगार नाही आहे. सत्तेत साडेसात वर्ष असूनही देशातील तरुण बेरोजगार आहे. शिक्षण घेऊनही तरुणांना नोकऱ्या नाहीत. आज आई-वडील आपल्या सुशिक्षित मुलांना रस्त्यावर रिक्षा चालवतांना, मोलमजुरी करतांना आणि रस्त्यावर भजी तळतांना पाहत आहेत. हे सर्व शक्य झाले आहे मोदी सरकारमुळे, तरूण मुलांचे भविष्य त्यांच्याकडून खेचून घेतले आहे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवले आहे. अशी खोचक टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी आपल्या ट्विटद्वारे मोदींवर केली आहे (Congress leader Rahul Gandhi has sharply criticized Modi in his tweet).
पढ़े-लिखे नौजवानों के माता-पिता उन्हें रिक्शा खींचने या मज़दूरी करने या सड़क किनारे पकोड़े तलने पर मजबूर होता देख रहे हैं।
भविष्य छीनकर मोदी सरकार ने उन्हें आत्मनिर्भर कर दिया। pic.twitter.com/2iI1HDLVfL
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 29, 2021
राष्ट्रवादीची विरोधी पक्षावर खोचक टीका; तुम्ही फक्त भावनिक मुद्द्यांचे राजकारण करा
मविआचे नेते व मंत्र्याकडून रेस ट्रॅकवर गाडी पार्किंगवरून प्रविण दरेकर यांची बोचरी टीका
या ट्विट सोबत राहुल गांधींनी एक फोटो शेर केला आहे. ज्यात अस लिहल आहे. सत्तेच्या आठव्या वर्षात असतांनाही नोकरी-रोजगार उध्वस्त झाले आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या चकीत करून टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीमुळे झालेल्या तरुणांची आत्महत्यांची संख्या ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
फडणवीसांच्या संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून मविआच्या नेत्यांची टोलेबाजी
No meeting with Navjot Singh Sidhu, says Rahul Gandhi amid Punjab Congress infighting
मात्र, यावर अजूनही मोदी सरकार काही करत नाही आहे. मोदी म्हणाले होते की अच्छे दिन येणार. परंतु, रोजगार नाही म्हणून देशातील तरुण आत्महत्या करत आहे. हेच मोदींचे अच्छे दिन आहेत का? अजूनही तरुणांना नोकऱ्या नाहीत. मोदी सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. मोदी सरकारने देशातील तरूणांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन विसरून गेले आहेत (The Modi government has forgotten by promising to provide employment to the youth of the country).