सध्या ऑस्ट्रेलियाचा पुरुष संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत सुरू होणारा टी20 विशे्वचषक लक्षात घेता दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही संघांना आपले बळ आजमावण्याची आणि विरोधी संघातील कमी शोधून काढण्याची आता शेवटची संधी आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. सध्या 3 सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामने निकाली लागले आहेत. या मध्ये सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1च्या बरोबरीवर आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेवर आपले नाव कोरण्यात यशस्वी ठरेल. तिसरा सामना सुरू होण्यापूर्वी मैदानातील खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज आपण यावेळी घेणार आहोत.
हवामान अहवाल
हैदराबादमध्ये संध्याकाळचे तापमान 24-25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आर्द्रता 80 टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे आणि दव देखील सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. हैदराबादमध्ये संध्याकाळी पाचच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पाहता दोन्ही संघांच्या कर्णधारांना प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. जेणेकरून लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे जाईल. नागपुरातही पावसामुळे 8-8 षटकांचाच खेळ होऊ शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ विजयी झाला होता.
हे सुद्धा वाचा…
PFI Scam : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्याच नाहीत, पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण
ODI ENGW vs INDW : भारतीय महिला संघाने इंग्रजांचा बदला घेतलाच! घरच्या मैदानावर दिलाय व्हाईट वॉश
MS Dhoni Live : धोनीच्या मनात नेमकं काय सुरूये! आज दुपारी ‘या’वेळी साधणार चाहत्यांशी संवाद
खेळपट्टीचा अहवाल
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची विकेट ऐतिहासिकदृष्ट्या फलंदाजांसाठी अनुकूल आहे. आतापर्यंत या मैदानावर सहा कसोटी, सहा एकदिवसीय आणि केवळ एक टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. 2019 मध्ये भारतीय संघ शेवटच्या वेळी येथे टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यावेळी विराट कोहलीच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर संघाने वेस्ट इंडिजसमोर 209 धावांचे लक्ष्य गाठले.
भारताचे संभाव्य खेळ 11: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक(यष्टीरक्षक), अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलियाचे संभाव्य खेळणे 11: ऍरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिश, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दरम्यान, हा सामना संपल्यानंतर भारताला टी20 विश्चषकाची तयारी करण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातदेखील 3 टी20 सामन्यांची मालिका नियोजित करण्यात आली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 28सप्टेंबरपासून सुरुवात होईल. त्यामुळे टी20 विश्वचषकापूर्वी होणाऱ्या 4 टी20 सामन्यांत भारताला संघनिवडीवर भर देणे गरजेचे बनले आहे.