टीम लय भारी
मुंबई : राज्य सरकारने परमबीर सिंह बेपत्ता असल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच पेटलेलं दिसून येते आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे (Amruta Fadnavis sharply criticizes Thackrey government).
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे कुठे हनिमूनला गेलेत माहीत नाही? एक पोलीस कमिशनर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहिती नाही. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे.’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची ‘ही’ महत्त्वाची लक्षणे जाणून घ्या
अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी कोणत्याही प्रकारची शोधमोहीम राबवली गेली नाही; एनसीबीचे स्पष्टीकरण
बुधवारी परमबीर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर करण्यात आलेल्या सुनावणीत न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी खंडपीठाच्या याचिकेवर आपली भूमिका मांडली. या दरम्यान परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे राज्य सरकरतर्फे वरिष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी न्यालयाला सांगितले.