लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेससोबत आमचे राजकीय मतभेद आहेत. तो आमचा दुश्मन नाही. भाजपसोबत सुद्धा आमचे मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेस स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न करीत असेल तर महाराष्ट्र त्याचे स्वागतच करेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील या सगळ्यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. जीएसटी, नोटबंदी अशा मुद्द्यांवर आमचे भाजपसोबत मतभेद आहेत. बेळगाव महाराष्ट्रात यावा ही शिवसेनेची भूमिका आहे. भाजप सरकारने त्यासाठी तडफ दाखवावी. या मुद्द्यावरही आमचे भाजपसोबत मतभेद आहेत, असे खासदार राऊत यांनी सांगितले.
काँग्रेससोबत मतभेद असले तरी आम्ही एकत्र येऊ शकतो, असे संकेत राऊत यांनी दिले असल्याचे दिसून येत आहे.